Friday, August 6, 2021

पेच

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

चंद्र-तारे फुलं नि पक्ष्यांना
बळेच एकत्र मांडावं
नेमकं त्याच कडव्यावर
का मनान सांडावं?

आजच्या बंडखोर लेखकानं
कालच्याला भांडावं
दोघांचही चुकत नसतं
कुणाला समोर ठेवावं?

तिन्हीसांजेची वेळ समोर
आणि एकांतान घेरावं
कितीही नको म्हटल तरी
का आठवणींनी आठवावं?

शीळ येते मुक्कामी
शब्दांनी का रूसावं?
सुस्कारे नि हुंकार
याला गुणगुणनं कस म्हणावं

काय लिहावं?
काय वाचावं?
काय आठवावं?
काय गुणगुणावं?

- संदीप चांदणे (१७/४/२०११)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...