Tuesday, August 5, 2014

विरह

नाजूक हास-या कळ्या, हरवले चांदणे माझे
बुडून बसले काळोखात विरहाचे क्षण माझे

स्वप्नांचाही गुंफता येईना, गोफ, डोळे मिटून
विचारात जागते माझी, रात्र, कूस बदलून

उधळीन तुझ्या वाटेवर, जे तुला हवे
येशील का सांग, तू श्रावण सरींसवे?

- संदीप चांदणे (5/8/2014)

No comments:

Post a Comment

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...