Tuesday, August 5, 2014

विरह

नाजूक हास-या कळ्या, हरवले चांदणे माझे
बुडून बसले काळोखात विरहाचे क्षण माझे

स्वप्नांचाही गुंफता येईना, गोफ, डोळे मिटून
विचारात जागते माझी, रात्र, कूस बदलून

उधळीन तुझ्या वाटेवर, जे तुला हवे
येशील का सांग, तू श्रावण सरींसवे?

- संदीप चांदणे (5/8/2014)

No comments:

Post a Comment

सुखनिद्रा

गारव्याची शाल मऊ अन स्वच्छ निरभ्र नभ निळे तृणपात्यांचा मऊ बिछाना रोज न असले सुख मिळे गंधाचा हलके शिडकावा ताटव्यातली करती कुसुमे मध्येच पिवळी...