Tuesday, August 5, 2014

विरह

नाजूक हास-या कळ्या, हरवले चांदणे माझे
बुडून बसले काळोखात विरहाचे क्षण माझे

स्वप्नांचाही गुंफता येईना, गोफ, डोळे मिटून
विचारात जागते माझी, रात्र, कूस बदलून

उधळीन तुझ्या वाटेवर, जे तुला हवे
येशील का सांग, तू श्रावण सरींसवे?

- संदीप चांदणे (5/8/2014)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...