Friday, May 1, 2015

ऋतू अजून नाहता आहे

उधळ तिच्या वाटेवर जे तिला हवे
येईल ती तुझ्याकडे श्रावण सरींसवे

श्रावण सरला सरी बरसल्या उभा वाटेवर अजून
उधळू काय? दिल्या पुष्पांनीही माना टाकून
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे...

कर गोळा पुष्पे दुसरी
रस्ता हा बहरता आहे

वेचता पुष्पे युगे सरली झालो मीच रस्ता
मोजता पांथिक वाटेचे या जीवाला खस्ता
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे...

रस्ताच हो असा मग तू
बहराचा जो चाहता आहे

कडेला माझ्या तणपाला फुटेना ना अंकुर
बहर अजून आहे माझ्या फार फार दूर
ती ना आली, एकटा मी विरहाच्या क्षणांसवे

अंकुराला उब मिळू दे
ऋतू अजून नाहता आहे

- संदीप चांदणे (०५/०१/२०१४)

No comments:

Post a Comment

तानाजी आन नाथाजी

भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. तरीबी, रानात सरळसोट पाळ्या न्हाय घातल्या, आठ दिसांत जोंधळ्यात बैलजोडी ...