Wednesday, May 28, 2025

एक अर्थहीन गजल

आहे अंगणात वारा, निवारा घरात आहे
तरी माजला कल्लोळ कसला मनात आहे?

रोज तसाच दिवस, तसलीच रात्रही येते
बदलून नव्या फक्त दुःखाची आयात आहे

कुठलाच सूर आनंदी येईना बासरीतून
इतकी उदासवाणी माझी हयात आहे

सूर्याची दैवी थाळी गोष्टीमध्येच राहिली
आता उघड्यावर उपडी माझी परात आहे

मदतीस धावणारे आता ना पाय दिसती
दिसते ती निघालेली कोडगी वरात आहे

- संदीप भानुदास चांदणे (बुधवार, २८/०५/२०२५)

No comments:

Post a Comment

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...