Saturday, December 29, 2012

अबोला!

तुझे शब्द ना माझ्या कानावर
ना माझे शब्द तुझ्या कानावर
होतील अशाने भावना अनावर
राहील कुणी कसे मग भानावर?

शब्द तुझ्याजवळ नाहीत
शब्द माझेही संपले
नव्या ओळी रचण्याची
सांग जबाबदारी कोणावर?

पूर्वी अनोळखी होत्या
वाटा ज्या जुळाल्या
अजूनही रस्ता पुढेच आहे
नजर खिळली का फाट्यावर?

कागदाचे काही कपटे 
मर्मबंधाची ठेव होतील
मग, उलगडून वाचताना,
शब्द ओघळतील गालावर

चांदण्या रात्री आकाश पाहताना
जाणवेल भेसूर नीरवता
नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता
आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर!

1 comment:

आनंदोत्सव

निळापांढरा उडवीत पदर राधा होऊन धरती नाचे हिरवाईचा हर्षवायू बळीराजाच्या उरात साचे शिवारात वाऱ्याचा पिंगा पिकांचे तालात डोलणे थव्याथव्यांनी नभ...